शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

उसाला ३,५०० पहिला हप्ता द्या:रघुनाथदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 22:48 IST

सातारा : ‘फितूर राजू शेट्टींसारख्या लोकांना हाताशी धरून अच्छे दिन वाल्या या सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. नीरव मोदी, ...

सातारा : ‘फितूर राजू शेट्टींसारख्या लोकांना हाताशी धरून अच्छे दिन वाल्या या सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. नीरव मोदी, विजय मल्ल्या हे कर्ज बुडवून गेले तरी बँका बुडाल्या नाहीत. मग लाखात कर्ज असून शेतकरी काळजीने आत्महत्या करत आहेत. अशावेळी रडत बसू नका तर लढण्यासाठी तयार राहा. हमीभाव नसल्याने आता कर्ज बुडवा,’ असा सल्ला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला. दरम्यान, यावेळी त्यांनी उसाला ३,५०० रुपये पहिला हप्ता द्यावा, असे स्पष्ट केले.क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथील शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत ते बोलत होते. क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजीराव नांदखिले, शंकरराव गायकवाड, महिला आघाडी राज्यध्यक्षा वंदना माळी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पठारे, संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, जिल्हाध्यक्ष विकास जाधव, टी. के. आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती.रघुनाथदादा म्हणाले, ‘रिकव्हरीचा पाया बदलून तुमचा खिसा कापला जात आहे. गुजरातमध्ये टनाला ४,७४१ रुपये भाव आहे. तुमच्या उसाला १,५०० रुपये कमी देत आहेत. एकरकमी एफआरपी मिळावी, अशी मागणी आहे. ३,५०० रुपये पहिला हप्ता मिळण्याची गरज आहे. उपपदार्थातील ५० टक्के नफा मिळाला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी मिळून लढा उभा केला पाहिजे. ऊस बिलातून अनेक कारणांनी पैसे कापले; पण भामट्या कारखानदार व सरकारने या ठेवी बुडविण्याचे पाप केले आणि ठेवींचे रुपांतर शेअर्समध्ये केले. डिव्हिडंट नसल्याने शेतकºयांचे नुकसान आणि कारखान्याचे शेअर भांडवल वाढले आहे.आपेट म्हणाले, ‘सदाभाऊ खोत यांची २३ रोजी ऊस परिषद होत असून, त्याला मुख्यमंत्री येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित ऊस परिषद कशासाठी? एफआरपीचे २५५ कोटी रुपये शेतकºयांना शासनाकडून येणे आहे. ती अगोदर मिळणे आवश्यक आहे.’एफआरपीचे तुकडे करणाºयांचा निषेध...‘मागीलवेळी शेट्टी, सदाभाऊ खोत यांनी एफआरपीच्या वर २०० रुपये घेऊन आंदोलन मागे घेतले. केवळ रघुनाथदादा पाटील यांनी शेवटपर्यंत ३,५०० रुपयांच्या एफआरपी वर ठाम राहिले. त्यामुळे एफआरपीचे तुकडे करणाºयांचा आम्ही निषेध करतो. शेतकºयांची वीज कपात होत असताना सत्ताधारी आणि विरोधक हे गप्प बसत आहेत, याचा आम्ही निषेध करतो, असे शिवाजीराव नांदखिले यांनी स्पष्ट केले.